५ ते ८ वी इयत्तेपर्यंत शाळा सुरू होतील
मुंबई - गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा आता सुरू होणार आहेत. २७ जानेवारीपासून शाळा खुल्या होतील. मात्र, केवळ ५ ते ८ वीच्या इयत्तेपर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू होतील.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थितीत होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शाळा सुरू करण्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार राज्यातील ५ ते ८ वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती गायकवाडांनी दिली. मात्र, शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.