गंभीर रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरपी!

    03-Sep-2020
Total Views | 116
plasma therapy_1 &nb


मुंबईत तीन रुग्णांवर यशस्वी उपचार!


मुंबई : कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरपी केली जाणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या या उपचार पद्धतीला यश येत असून आहे. आतापर्यंत तीन गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली.


कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. २ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख १९ हजार ७०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आता केवळ २०८१३ सक्रिय रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाईननुसार प्लाझ्मा थेरपीदेखील सुरू करण्यात आली आहे. यासाठी पालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय प्लाझ्मा थेरपी सेंटर बनवण्यात आले आहे. या प्लाझ्मा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ रुग्णांवर प्लाझा थेरपी करण्यात आली असून संबंधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली.


या प्लाझ्मा थेरपीला येणारे यश पाहता ही उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात वापरली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या उपचार पद्धतीसाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी प्लाझ्मा दान करणाऱ्यांना सेंटरवर आणणे, त्यांच्या आवश्यक चाचण्या करणे, प्रवास सुविधाही पालिकेच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.




अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121