'तर मध्यावधीला पर्याय नाही' : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

ch patil_1  H x


'सध्याच्या सरकारला काहीतरी पर्याय नक्कीच उभा राहील' 

मुंबई :
'दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर ते चहा-बिस्किटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय चर्चा होणारच,' असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला जोर आला आहे. ते म्हणाले, 'संजय राऊत व फडणवीसांच्या भेटीत राजकीय विषय निश्चितच होते. पण त्यातून कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही. आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. त्यात केवळ पैसाच खर्च होतो असा नाही, आज कोरोनाचे संकट आहे. त्यात निवडणूक घेणे शक्य नाही. अशावेळी सध्याच्या सरकारला काहीतरी पर्याय नक्कीच उभा राहील. निवडणूक न होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतील पण कोणतेच समीकरण जुळले नाही तर मग पर्याय नसेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भाजप राज्यात यापुढील सर्व निवडणुका स्वबळावरच लढेल असे त्यांनी स्पष्ट केले.




दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईतील एका हॉटेलात भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. ही भेट राजकीय नव्हती. 'सामना'साठी घ्यावयाच्या मुलाखतीबाबत होती, असा खुलासा राऊत यांनी केला आहे, तर फडणवीसांनी यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. असे असूनही या भेटीची चर्चा थांबण्यास तयार नाही. त्यातच सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला जोर आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@