गावस्कर यांची 'ती' कॉमेंट्री हटवण्याची मागणी
मुंबई : आयपीएल चषकाचा (IPL 2020) पहिला वाद आता उफाळून येत आहे. माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर आणि आणि अनुष्का शर्मा यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सुनील गावस्कर यांनी समालोचन करत असताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अनुष्का चांगलीच भडकली आहे. तो भाग कॉमेंट्रीतून वगळावा, असेही अनेकांनी मत व्यक्त केले आहे.
गुरुवारी आरसीबी ( RBC ) आणि ( KXIIP ) किंग्ज इलेव्हेन पंजाब यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीला चमक दाखवता आली नाही. त्याने दोन झेलही सोडल्या होत्या. त्यावेळी हिंदीतून कॉमेंट्री करत असणाऱ्या गावस्कर यांनी विराटच्या सरावाचा उल्लेख केला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी अनुष्काबद्दलचा उल्लेख केला. यावरून विराटचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत. तो भाग समालोचनातून वगळावा, अशी मागणी आता त्यांनी केली आहे.
या प्रकारानंतर अनुष्कानेही गावस्कर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ती म्हणते, " मिस्टर सुनील गावस्कर आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिते की, तुमचे वक्तव्य हे अप्रिय होते. मी आपल्याला विचारू इच्छिते की तुम्ही अशा प्रकारचे विधान का केले होते. तसेच एका क्रिकेटरच्या खेळासाठी त्याच्या पत्नीला का जबाबदार धरता. प्रत्येक खेळाडूचे एक वैयक्तीक आयुष्य आहे. तुम्हाला असे वाटत नाही का सर्वांचे वैयक्तीक आयुष्य तसेच अबाधित रहायला हवे.
विराट कोहली या सामन्यात केवळ एक धाव करून बाद झाला होता. त्यातच क्षेत्ररक्षण करत असताना त्याने के एल राहुलचे दोन झेल घेतले नाहीत. के.एल.राहुलने शतक ठोकले होते. त्यावेळी समालोचन करत असताना गावस्कर यांनी ही बाब बोलून दाखवली होती. त्यावरून हा वाद उफाळून आला आहे. गावस्कर यांना आरसीबीच्या फॅन्सनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात पंजाबने आरसीबीवर ९७ धावांनी विजय मिळवला होता.