नवी दिल्ली : आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगानं एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. देशात करोना संक्रमणाचा धोका वाढलेला असताना या पहिल्याच मोठ्या निवडणुका ठरणार आहेत. त्यामुळे एक वेगळेच आव्हान निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांसमोरही असणार आहे.२९ नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपतो आहे.