घरात बसण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं नाही : संदीप देशपांडे

    02-Sep-2020
Total Views |

sandip deshpande_1 &

मुंबई :
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “मुख्यमंत्र्यांना जर जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये”, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला.



“पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाला. तुम्ही यंत्रणा नीट चालवत नाहीत. यंत्रणा नीट चालते की नाही, याची माहिती घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे. ती जबाबदारी त्यांना पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. तुम्हाला घरी बसवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री केलेले नाही”, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला. “पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासारख्या हजारो घटना गेल्या ५ महिन्यात घडल्या आहेत. बीकेसी, नेस्को किंवा परवा पुण्यात उद्घाटन झालेले कोव्हिड सेंटर असेल, यात लोकांना उपचार मिळत नसतील तर सरकारला लाज वाटली पाहिजे. मोठी मोठी कंत्राट द्यायची, पण त्याचा काय फायदा?कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना उपचारच मिळत नसतील तर तिथे पैसे ओरपण्याचे काम सुरु आहे. तिथे जे रुग्ण बरे होत आहेत ते राम भरोसे होत आहेत”, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला.