मुंबई : सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात माझ्यावर नाहक चिखलफेक होत आहे, ठाकरे सरकार चांगले काम करत असल्याची पोटदुखी अनेकांना आहे त्यामुळेच असले गलिच्छ राजकारण केले जात आहे, तरीही मी संयम बाळगून आहे, अशी प्रतिक्रीया युवा सेना अध्यक्ष कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. सुशांत सिंह प्रकरणावर पहिल्यांदाच त्यांनी मौन सोडले आहे.