सारथीच्या सभेत छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |

sarthi sabha_1  



मुंबई :
आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्याने मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला.



बैठकीत छत्रपतींनी तिसऱ्या रांगेत स्थान दिले जात असेल तर आम्ही बाहेर काय तोंड दाखवणार, असा प्रश्न मराठा समाजाच्या समन्वयकांनी उपस्थित केला. त्यामुळे बैठकस्थळी गोंधळ निर्माण झाला. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत 'मी इथे केवळ एक सदस्य म्हणून आलो आहे. त्यामुळे मान-अपमान महत्त्वाचा नाही. तर सारथी महत्त्वाची आहे,' अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी समन्वयकांची समजूत काढली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मध्यस्थी करून गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला. यावर सभेत छत्रपतींना सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणी समन्वयकांनी केली. 



आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्याने मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ घातला. परंतु संभाजीराजेंनी समन्वयकांची समजूत काढली. या सर्व प्रकारानंतर बैठक सुरु झाली. काही प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर संभाजीराजे यांनी आपले निवदेन व्यक्त करण्याची इच्छा दर्शवली. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी या बैठकीतून काढता पाय घेतल्याचे समन्वयकांनी म्हंटले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्या दालनात याबाबत चर्चा करु असे सांगितले असून सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये आता या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे.
@@AUTHORINFO_V1@@