तुम्ही टीका करा, आम्ही आमचे काम करत राहू; देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रतुत्तर!
मुंबई : ‘सामना’तून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र या टीकेला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीने पाच वर्षे जरूर सरकार चालवावे, त्यांना शुभेच्छा आहेत; पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, असे फडणवीस म्हणाले. ‘सामना’ रोज आपली भूमिका बदलतो. कधी पवारसाहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने.
त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, फडणवीस यांनी ‘सामना’च्या भूमिकेवर बोलताना बाळासाहेबांच्या वेळेसचा सामना, अशी दुटप्पी भूमिका मांडणारा नव्हता असेही म्हटले आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे? भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, अशा शब्दांत फडणवीसांनी सामनावर टीका केली आहे. “त्यांना काय करायचे ते लख लाभ, आम्ही आमचे काम करत राहू. आम्हाला सरकार पाडायची घाई नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी पाच वर्षं सरकार चालवावे. ” असे फडणवीस म्हणाले.