दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अजितदादांचा मोलाचा सल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |
ajit pawar_1  H




पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात कोकण विभागाने बाजी मारली आहे, तसेच अपेक्षेप्रमाणे मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. राज्यभरातून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. परंतू नापास विद्यार्थ्यांना धीर देण्यासही ते विसरले नाहीत. 



उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन त्यानी केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्यात मात्र, दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत व त्यांच्या पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. चिकाटीने यश खेचून आणलं पाहिजे. अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीनं प्रगती करतील हा विश्वास आहे, असे अजितदादा म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@