नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असे काही जणांना वाटते.” असे वक्तव्य केले होते. यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपच्या उमा भारती यांनी यावर, “शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
“नेपाळचे पंतप्रधान ओली यांना भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला, असे वाटत असेल तर त्यांनी तिथे राम मंदिर बांधावे आणि त्याची पायाभरणी करावी.” अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असे काही जणांना वाटते” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांच्यावर भाजपने सडकून टीका केली.