निलेश राणेंचा शिवसेनेला टोला
मुंबई : राज्यातील सत्ताधारी पक्षाने तत्कालीन सरकारमुळे IFSC केंद्र गुजरातला गेल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता विविध गोष्टी उघड होत आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यावेळी हे केंद्र गुजरातमध्ये गेले त्यावेळीही सुभाष देसाई महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत. तेव्हा झोपला होता का?, असा टोला त्यांनी लगावला आहे.
राणे म्हणाले, "IFSC चा प्रस्ताव २०१५ ला तयार झाला आणि २०१७ डिसेंबरला अरुण जेटली ह्यांनी IFSC अहमदाबाद मध्ये होणार हे जाहीर केलं. तेव्हा युतीचं सरकार होतं आणि तेव्हा पासून सुभाष देसाई उद्योग मंत्री आहेत. शिवसेना आता विरोध का करतेय?? तेव्हा झोपले होते का???"