औरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या तब्लिगी जमातीच्या शहरात आलेल्या सात जणांना महापालिका प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात असून त्यांनाही क्वारंटाइन केले जाणार आहे. दिल्लीच्या मरकज मधून औरंगाबादमध्ये २९ तब्लिगी आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. २९ पैकी १४ जण औरंगाबाद शहरातील असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांना शोधून तपासणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.