साधूंची हत्या मार्क्सवादी हत्याऱ्यांनीच केली : सुनील देवधर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |
Sunil Deodhar_1 &nbs
 
 
 

साधूंना मारहाण करत असल्याची हल्लेखोरोंना पूर्वकल्पना !


मुंबई : पालघरमध्ये झालेला मॉब लिंचिंगचा प्रकार हा चोर समजून नव्हे तर साधूंना ठार करण्यासाठीच झाला आहे, वनवासी साधूंवर कधीच हात उचलणार नाहीत, मार्क्सवादी हत्यारेच असे कृत्य करू शकतात, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केला आहे. वनवासी भगवाधारी साधू संतांवर हल्ला करू शकतच नाहीत, त्यामुळे हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
पालघरमध्ये गेल्या आठवड्यात तीन जणांचा जमावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. रविवारी दुपारी या प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल झाला त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. सुनील देवधर यांनी ट्विट करत या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. वनवासी साधू-संतांवर कधीच हात उचलू शकत नाहीत, मारहाण करायला लावणाऱ्यांचे ब्रेन वॉश करण्यात आले आहे. डहाणूत ज्या ठिकाणी हा प्रकार झाला, तो सीपीएम आणि एनसीपी यांच्यातील युती असलेल्या आमदाराचा भाग आहे. त्यामुळे चोर समजून नव्हे तर साधू समजूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा देवधर यांनी केला आहे. त्यामुळे हल्लेखोरांना वनवासींनी नव्हे तर मार्क्सवादी गुंडांनीच मारले आहे, असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@