तब्लिगी जमातमध्ये औरंगाबादच्या २५ जणांची हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |

aurangabad_1  H



औरंगाबाद
: दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे २५ संशयित व्यक्तींची औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व संशयितांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नसली तरी त्यांच्यापैकी १२ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले व त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरीच अलगीकरण कक्षामध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी दोन जणांचे स्वॅब पुनर्तपासणीसाठी पुण्याच्या `एनआयव्ह`कडे पाठवण्यात आले आहेत.




दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरातील १२ व १३ मार्च रोजी झालेल्या 'तबलिगी जमात'च्या धार्मिक कार्यक्रमात देश-विदेशातून व देशातील अनेक राज्यांतून आलेले सुमारे अडीच हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी २४ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे व ४४१ व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली आहेत, तर यातील अनेकांचा मृत्यू झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या व नऊ मार्चपासून औरंगाबाद शहरातील नातेवाईकांकडे वास्तव्यास असलेल्या सात व्यक्तींची बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुधवार सायंकाळपर्यंत सुमारे २५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, जे निजामुद्दीनच्या कार्यक्रमात एकतर सहभागी झाले होते किंवा कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या संपर्कात तरी आले होते.मराठवाड्यातून मरकजला गेलेल्यांची संख्या १८० पेक्षा अधिक आहे. औरंगाबादेतील २४ जणांना होम क्वाॅरंटाइन केले आहे. या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये करोना विषाणू बाधेची लक्षणे आढळून आली नसली तरी नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १२ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत.यातील अनेकजण अंदमान-निकोबारचे रहिवासी आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक व नोडल ऑफिसर डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@