मुंबई : महाविकास आघाडीला १०० दिवस पूर्ण झाले. परंतु, त्वहिन पक्षातील मतभेद मात्र लपून राहिलेले नाहीत. खासकरून शिवसेना आणि राष्ट्रवादी- काँग्रेसच्या नेत्यांमधील दरी वारंवार दिसून आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुस्लिम आरक्षणावरून केलेले विधान हे काँग्रेसचे आमदार आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे नाराज असल्याचे दिसले. त्यामुळेच कदाचित महाविकास आघाडीसाठी झटणारे संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमधून 'आता डोळे उघडले आहेत का?' असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
संजय राऊत यांनी ट्विट केली आहे की, "कुछ रिश्ते दरवाज़े खोल जाते है, या तो दिल के, या तो आँखों के!". महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाते जुळवले. मग या नात्याने शिवसेनेच्या मनात जागा केली आहे की त्यांचे डोळे उघडले आहेत असा अर्थ या ट्विटमधून काढला जात आहे. सीएए, एनआरसी अशा मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद आहेत. सीएएवरुन काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. तर मुस्लिम आरक्षणावरूनही नेत्यांमधील विसंगती समोर आली आहे.