मुंबई : मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आग लागली नव्हती. थोड्या प्रमाणात शॉर्ट सर्किट झाले होते. बेस्टचा वीज पुरवठा करणारा स्टाफ घटनास्थळी तैनात करण्यात आला असून, घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
‘हा कसोटीचा काळ आहे. मात्र, मनोबल ढळू शकत नाही. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. सुदैवाची बाब म्हणजे, मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक सुरक्षित आहेत,' असे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटमध्ये सांगितले आहे.