मुंबई : मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेला हा महाराष्ट्रातील पहिला बळी ठरला आहे. मात्र, सुरुवातीपाऊसचं रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. इतर सर्व कोरोनाबाधित रुग्ण ही चांगल्या स्थितीमध्ये आहे. यामुळे आता भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
कोरोना बाधित मृत्यू झालेले वृद्ध हे व्यावसायिक होते. व्यापारानिमित्त ते दुबईला गेले होते. दुबईवरुन मुंबईत परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. या रुग्णावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर सारखे आजार असल्याचीही माहिती समोर येत आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर अली नसली तरीही रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.