मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. यामधील काही वक्तव्यांवर मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'ही तर अनैसर्गिक आघाडीचा खुलासा करणारी मुलाखत होती.' असे म्हंटले आहे.
''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा 'खुलासा' करणारी मुलाखत दिली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला 'दिलासा' देणारी अपेक्षित होती," अशा आशयाचे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.