शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
uddhav_1  H x W





प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांची प्रारंभी केली निवड; आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : शेतकरी डोळे लावून बसलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सोमवार, २४ फेब्रुवारीपासून मिळण्यास प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड केली असून सुमारे २० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात उद्यापासून पैसे जमा होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात ५ मार्च रोजी महिलांच्या समस्यांवर चर्चा होईल. ६ मार्चला अर्थसंकल्प मांडला जाईल. पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे विरोधकांसाठी सायंकाळी सह्याद्री राज्य अतिथीगृहावर महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चहापान आयोजित करण्यात आले होते. त्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला.


आपसात संवाद साधा आणि मगच चहापानाला बोलवा : देवेंद्र फडणवीस

सत्तेवर येऊन तीन महिने झाले तरी सरकारला सूर गवसलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. त्यांनी आधी आपसात संवाद साधावा, मगच आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार, पोलिसांचे खच्चीकरण आदी विषयांवर सरकारला घेरणार असल्याचेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@