"मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी दौऱ्यामुळे भाविकांची गैरसोय"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |
Uddhav-Thackeray _1 
 


निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका 

 
कणकवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदूर्ग दौऱ्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात जिल्हा नियोजन आढावा बैठकीत एकही निर्णय घेतला नाही, कोकणातील विकास कामांना दिलेल्या स्थगीतीवर घेतला निर्णय नाही, एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला नाही, त्यासंदर्भात पत्रकार परिषदही नाही, निर्णय घेण्याची धमक नाही तर आढावा का? घेता असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. उलट मुख्यमंत्र्यामुळे अंगणेवडीत भाविकांची गैरसोय झाली, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
 
 
'नाणार'वासीयांचाही उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारवासीयांच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. नाणारच्या प्रश्नांवर मौन बाळगल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. तसेच या दौऱ्यात भास्कर जाधव यांची नाराजीही उघड झाली. जाधव यांनी भर व्यासपीठावर विनायक राऊत यांचा हात झटकल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापासून कट्टर शिवसैनिक दूर राहीले, अशी प्रतिक्रीया राणे यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@