"५० जागांसाठी पावसात भिजावे लागणाऱ्यांनी भाजपबद्दल न बोललेले बरे"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |
Atul-Bhatkhalkar _1 


अतुल भातखळकर यांची राष्ट्रवादीवर टीका

मुंबई : "ज्या पक्षाच्या नेत्याला जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजाव लागते त्यांनी १०५ जागा जिंकलेल्या भाजपाबद्दल न बोललेले बरे," असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना लगावला आहे. शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाचे आमदार १०५ वरुन १५ होतील, असे वक्तव्य मलिक यांनी केले होते. या वक्तव्याचा आ. भातखळकर यांनी समाचार घेतला.
 
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा निवडणूका झाल्यास जनता महाविकास आघाडीला उत्तर देईल, अशी टीका पत्रकार परिषदेदरम्यान केली होती. २५ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीविरोधात मोर्चा काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती. यावरून नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.





@@AUTHORINFO_V1@@