भाजपनेच व्हीआयपी संस्कृती मोडीत काढली : माधव भंडारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |
madhav bhandari_1 &n




शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा टोला

मुंबई : भारतीय जनता पक्षानेच व्हीआयपी संस्कृती मोडित काढली. त्यामुळे सत्तेसाठी भुकेलेल्या शरद पवारांनी उसन अवसान आणू नये, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला.


माधव भांडारी म्हणाले की, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी सलाम करण्याची पद्धत राज्याचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बंद करायला लावली. तशा सूचना त्यांनी सर्वांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे तत्कालिन मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी ही व्हीआयपी संस्कृती मोडित काढण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला.


ते पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असल्याने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लाल दिव्याची संस्कृती बंद केली होती. त्यामुळे पवार साहेबांनी उसने अवसान आणू नये, असा टोला माधव भांडारी यांनी लगावला.
@@AUTHORINFO_V1@@