नवी दिल्ली : संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्यावर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. आयकरमध्ये काही बदल होतात का? याकडे मध्यमवर्गीयांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण, कृषी क्षेत्रासाठी मोदी सरकार कोणत्या नवीन योजना आणणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी वाचा...
सकाळी ११ च्या सुमारास लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्राला काय मिळणार? तसेच शेतकऱ्यांसाठी सरकार नवीन काय योजना आहेत? मुंबईमधील रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय असणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अर्थसंकल्पातून मिळणार आहे.
- आज शेअरबाजाराची सुरुवात पडझडीने, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच प्री-ओपनिंगला शेअर बाजारा १०० अंकांनी कोसळला.