रिपब्लिकच्या कर्मचाऱ्याला पंचवीस दिवसांनी जामीन मंजूर

    05-Dec-2020
Total Views | 128

republic _1  H



पनवेल (सोमेश कोलगे) :
रिपब्लिक टीव्ही ग्रुपचे कर्मचारी घनश्याम यांना अखेर पंचवीस दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. अर्णव गोस्वामींना अटक झाल्यानंतर घनश्याम यांना अटक झाली होती. पोलिसांच्या वतीने वेळ मागून घेण्यात येत होता. परंतु न्यायालयाने अखेर घनश्याम यांचा जामीन मंजूर केला आहे. घनश्याम सिंग हे रिपब्लिकच्या वितरणाचे काम पाहतात. कथित टीआरपी घोटाळ्याचे कारण देऊन घनश्याम यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेच्या वेळी तोंडाला काळे फडके बांधून कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे नेण्यात आले होते. घनश्याम यांचा दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. घनश्याम कारागृहात असल्यामुळे परिवाराची दिवाळी त्यांच्याशिवाय गेली. आज घनश्याम यांना अटकेनंतर पंचवीस दिवस कारागृहात काढल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121