मा. गो. वैद्य अनंतात विलीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |
Ma Go Vaidya _1 &nbs
 
नागपूर : राष्ट्रवादी विचारवंत, हिंदुत्वाचे भाष्यकार, ‘दै. मुंबई तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य रविवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी अनंतात विलीन झाले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 




ज्येष्ठ पुत्र धनंजय यांनी अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, राज्याचे माजी माहिती संचालक सहस्रभोजनी, संघाचे प्रचारक प्रसाद महानकर, गणेश शेटे, क्षितिज गुप्ता, आ. परीणय फुके, आ. विकास कुंभारे यांच्यासह वैद्य कुटुंबीयांचे आप्त व चाहते उपस्थित होते. 
 
 
 
 
रविवार सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर ८०, विद्याविहार, प्रतापनगर, येथून अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी घाटावर मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंत्ययात्रेपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केले. वैद्य यांच्या जाण्याने संघाचा शब्दकोश हरवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 
 
ते संघ विचार जगले. सल्लामसलत करण्याचे ते हक्काचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने आता काही विचारायचे ते कुठे, असा रिक्तपणा निर्माण झाला आहे. जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले, अशी शोकसंवेदना भागवत यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केले. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृह येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.




@@AUTHORINFO_V1@@