नवी दिल्ली : हाथरसमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये आता नवीन डावे समोर येत आहेत. ही घटना म्हणजे ऑनर किलिंगचा प्रकार आहे, असा दावा आरोपींच्या वकिलाने केला आहे. हे वकील म्हणजे निर्भय प्रकरणामध्ये आरोपींची बाजू मांडणारे ए. पी. सिंह हे आहेत. या प्रकरणातील आरोपी संदीप सिंह याने हाथरसच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले, ज्यामध्ये पिडीतेच्या आई आणि भावानेच तिची हत्या केल्याचा आरोप त्याने केला आहे.
आरोपीचे वकील ए. पी. सिंह यांनी यावेळी सांगितले की, “पोलीस तपासामध्ये घटनास्थळावरुन हत्येच्या वेळी केवळ पीडितेची आईच नाही, तर गावातील इतर काही लोकही उपस्थित होते. त्यांची चौकशी केल्यानंतर त्या रात्री नक्की काय घडले हे स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे हा प्रकार ऑनर किलिंगचा आहे.” असा दावा त्यांनी केला आहे.