मुंबई : गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठी आरक्षणासाठी लढणाऱ्या उदयनराजे आणि संभाजी राजे यांच्यावर टीका केली. याबाबत छत्रपतींच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. गुरुवारी त्यांनी ‘राज घराण्यांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का?’ अशी टीका केली होती.
मात्र ते ट्विट त्यांनी डिलीट केले असून शुक्रवारी पुन्हा ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचे खरंच आश्चर्य वाटले. घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचे माझे ट्विट डिलिट केले कारण इतरांना काहीच घेणे देणे नाही राहीले.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.