लोकल फेऱ्या वाढवा ; उच्च न्यायालयाचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

Mumbai local_1  
 
 
मुंबई : अनलॉकची घोषणा होताच मुंबई लोकल रुळांवर आली, पण तीही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाश्यांसाठी. मुंबई लोकल चालू झाल्या मात्र २ लोकलमध्ये तासाभराचे अंतर असल्याने प्रवाशांची गर्दी होऊ लागली. त्यानंतर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली. आता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील ‘राज्य सरकारने लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात असे आदेश दिले आहेत. अनलॉक-५ मध्ये बऱ्यापैकी सर्व प्रकारचे व्यवसाय-उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लोकल रेल्वेंमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
 
 
 
सध्या अनलॉक-५मध्ये शहरातील मॉल्स, हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयेही १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच इतर उद्योगही सुरू झाले आहेत. या मागणीनुसार रेल्वे गाड्यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . न्यायालयात रेल्वेशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी सुरू होती. मध्य रेल्वे मार्गावार गाड्यांची संख्या वाढवून ६०० आणि हार्बर लाईनवर ७०० करावी असेही न्यायालयाने सुचवले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@