मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चांडेल यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यावर कंगनाने ट्वीत करत म्हंटले की, "माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही" यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या समन्सबद्दल 'वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.' असे म्हणत महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले होते की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.