काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्यांचे : नितेश राणे
मुंबई : वीज पुरवठा खंडीत प्रकरणामुळे भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आता फक्त 'डायनसोर' आणि 'एलियन' दिसायचे राहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. राणे म्हणतात, "काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्यांचे खुर्चीवर बसल्या पासुन जे कधी नाही ते सगळ होत आहे. आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत. ते ही दिसतील कदाचीत.पनवती!!!, अशा शेलक्या भाषेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
उर्जा मंत्री नीतिन राऊत आणि राज्य सरकारच्या कारभारावर भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनीही टीका केली आहे. राज्य सरकारचे सर्कीट ठिकाणावर आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?, असा सवाल करतानाच या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.