उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात मजूर महिलेवर वीटभट्टी चालकांनी तिच्यावर आठवडाभर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आल्याने राज्यात खळबळ माजली. मात्र, या घटनेला २२ दिवस उलटून गेले असताना अद्याप आरोपी फरारच असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाच अटक झाली नसून हे सरकार झोपे आहे का? की झोपेचे सोंग घेतले आहे ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारला आहे की, “हे सरकार झोपले आहे की सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे? क्रूर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या उमरग्याच्या वीटभट्टी मजूर भगिनीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, “२२ दिवस झाले तरीही आरोपी अजून फरार आहेत. ते खरच फरार आहेत की, त्यांना पाठीशी घातले जात आहे?” अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली.