पाकमधील अल्पसंख्यांकांचा छळ हे वास्तव : हरसिमरतकौर बादल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |

rahul gandhi _1 &nbs



नवी दिल्ली : पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारा येथे झालेल्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध केला गेला. भारतात सर्वत्र या घटनेचा निषेध होत असताना मात्र काँग्रेसकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्यांनी ट्विट करत पाकिस्तान व राहुल गांधींचा निषेध केला. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,"कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुद्वारा नानकसाहिबच्या दगडफेकीचा निषेध करण्यास नकार दिल्याने आणि पवित्र मंदिराच्या अस्तित्वाला धोका दर्शविल्यास नकार दिल्याने त्यांचा शीखविरोधी चेहरा उघडकीस आला आहे. राहुल गांधी याना नागरिकत्व कायद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ओव्हरटाईम काम करत आहेत, परंतु त्यांना पाकिस्तानकडून अत्याचारांवर प्रकाश टाकण्यासाठी वेळ नाही." अशा तीव्र शब्दात त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.






हल्ल्यांनंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही जाब विचारला. त्या म्हणतात
,'पाकमधील अल्पसंख्यांकांचा छळ हे वास्तव आहे. गुरुद्वारा श्री नानकानासाहिब वर आज झालेल्या हल्ल्याने त्याचा भयानक चेहरा दाखवला आहे. मला आश्चर्य वाटते कि, काँग्रेसचे नेते कँप्टन अमरिंदर सिंग देखील पंतप्रधान मोदींचा विरोध कसे करू शकतात. जे अशा अनन्वित छळ सहन करत असणाऱ्या अल्पसंख्याकांना हक्क देण्याची उदार मानवतावादी इच्छा बाळगत आहेत."

 





पाकिस्तानमधील या गुरुद्वारामध्ये सध्या २००शीख राहत आहेत. जमावाने गुरुद्वारावर दगडफेक करत गेट तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी हसनविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक जारी केले असून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तोडफोड करणाऱ्यावर पाकिस्तान सरकारने कारवाई करावी. तसेच ननकाना साहेब गुरुद्वाराच्या सुरक्षितेसंबधी उपाययोजना करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.



@@AUTHORINFO_V1@@