महाविकासआघाडीत धुसमुस ; इंदिरा गांधींच्या टिकेवरून चव्हाण आव्हाडांवर भडकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |

asf_1  H x W: 0
 


मुंबई
: सत्तास्थापन आणि खाते वाटपानंतरदेखील महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमधील धुसमुस काही कमी होण्याचे नाव घेत नाही. नेत्यांमध्येच 'तुझं माझं पटेना' चे चित्र वारंवार दिसून येत आहे. नुकतेच एका कार्यक्रमामध्ये 'इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता.' असे वक्तव्य राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भरसभेमध्ये केले होते. यावर आता काँग्रेस नाराज असून काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावर आक्षेप नोंदवला.
 

काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी ट्विट केले की, "देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्यान इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल," असे त्यांनी बजावले आहे. बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये "देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला. त्यामाध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले." असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
 
जितेंद्र आव्हाडांची सारवासारव
 
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात. एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजीची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास ही पोहचू शकत नाही असं सांगत मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे असे स्पष्टीकरण दिले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@