नाशिक : नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू असून अंदाजे ३० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओ इंडिया या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
"महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दुःखद प्रसंगी मी मृतांच्या नातेवाईकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा." असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी आपले दुःख व्यक्त केले. बस नाशिकहून धुळ्याला जात असताना हॉटेल देश विदेश समोर मेशी शिवारात टायर फुटल्याने महामंडळाच्या बसचे समोरून येणाऱ्या रिक्षावर बस आदळून हा अपघात झाला.