महाविकास आघाडीत बिघाडी : मिलिंद देवरांचे सोनियांना पत्र

    28-Jan-2020
Total Views | 905
Milind-Devora-Sonia-Gandh



मुंबई :
मिलिंद देवरा यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहील्याने तीन दिवसांत तिसऱ्यांदा महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीदरम्यान आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी अपेक्षा देवरा यांनी व्यक्त केली आहे. देवरा यांनी हे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांकडे न देता थेट पक्षाच्या अध्यक्षांना दिल्याने याबद्दल पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
 
महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी यांनी त्यांच्या मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असे मिलिंद देवरा यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करत आहे. मात्र, काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेकडून संविधानाबाहेर कुठलेही काम केले जाणार नाही, याची लेखी हमी घेतल्याचे विधान केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्यावरून अशोक चव्हाणांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. 'अशोक चव्हाणांनी चुकीच्या प्रकारे वक्तव्य केले', अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121