टॉस जिंकत भारताने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय...
ऑकलंड : भारत-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आजचा सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ईडन पार्क मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जातो.
या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. न्यूझीलंड गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर भारत प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे.