वॉशिंग्टन : प्रियांका चोप्राच्या 'क्वांटीको' मालिकेची लेखिका शरबरी जोहरा अहमद यांनी बांग्लादेशी हे मुळचे हिंदू आणि भारतीयच आहेत, असे वक्तव्य केले आहे. "बांग्लादेशी आपले मुळ हिंदू असल्याचे कसे विसरू शकतात. इस्लाम हा त्यानंतर आलेला धर्म आहे. ते आपला मुळ धर्म विसरले आहेत.", असे त्या म्हणाल्या. शरबरी यांचा जन्म मुळचा बांग्लादेशातलाच मात्र, त्या अवघ्या तीन महिन्याच्या असतानाच त्यांचे कुटूंब अमेरिकेत स्थायिक झाले आहे. आपल्या भारत भेटीदरम्यान त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
लोकप्रिय अमेरिकन टिव्ही सिरीयल 'क्वांटीको'च्या पटकथेच्या त्या सहलेखिका आहेत. दक्षिणपंथी धार्मिक समुहांच्या प्रभावामुळे एक बंगाली म्हणून त्यांची प्रतिमा पूसट होत जात असल्याचे दुःख त्यांना होत आहे. क्वांटीको या सिरीजमध्ये प्रियांका चोप्राने प्रमुख भूमीका केली आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला प्रतिक्रीया देताना त्या म्हणाल्या, "बांग्लादेश मुळ हिंदूत्व विसरू कसा शकतो. इस्लाम तर नंतर आला. ब्रिटीशांनी फूट पाडल्यामुळे वादंग झाला, बांग्लादेशींच्या हत्या करण्यात आल्या."
"माझ्या आस्थेचे मुद्दे आणि बांग्लादेशची मुळ ओळख मी आपल्या 'DUST UNDER HER FEET' या कादंबरीत लिहीले आहेत.", असेही त्या म्हणाल्या. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्यावर त्यांनी टीका करत त्यांना नस्लवादी संबोधले आहे. आपल्या सैनिकांसाठी बंगालहून तांदूळ नेल्यानंतरही तिथल्या लोकांची त्यांनी परवा केली नाही, अशी टीका त्यावर केली.
"जेव्हा कुणी विस्टल चर्चिलची स्तूती करतो त्यावेळी मी सांगते, 'त्यांच्यामुळेच २० लाख बंगाली चर्चिलने उत्पन्न केलेल्या कुत्रिम दुष्काळात मारले गेले होते. तो भयानक होता.' आपल्या पुस्तकात त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बंगालची स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने अमेरिकन बंगालमध्ये आले होते.
"कोलकाता एक कॉस्मोपोलिटीन शहर होते. ब्रिटीशांनी लूटमार करत त्याचे वैभव ओरबाडून नेले. लोकांना हे सांगण्याची गरज आहे. बंगालींचे शोषण करण्यात आले. फाळणी करून लोकांमध्ये हिंसाचार, द्वेष पसरवण्यात आला, हे विस्मृतीत जायला लागले आहे. लोकांना हे सांगण्याची गरज आहे ", असेही त्यांनी सांगितले.
ज्यावेळी शरबरी जोहरा अहमद यांचा जन्म झाला होता, त्यावेळी त्यांच्या आईला हिंसाचाराची भिती वाटत होती. १६ ऑगस्ट १९४६ रोजी 'डायरेक्ट एक्शन डे' या दंगलीच्या दिवशी हजारो लोक मारले गेले होते. या सगळ्याचा परिणाम शरबरी यांच्या बालमनावर झाला. त्यामुळे तो काळ त्यांनी आपल्या पुस्तकासाठी निवडला, असे त्यांनी सांगितले.