अहमदाबाद : गेल्या काही दिवसात विद्यापीठांमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.अहमदाबादच्या इंडस विद्यापीठाच्या एका कार्यक्रमानंतर स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सुरक्षेचा अर्थ प्रत्येक कॅम्पसमध्ये एक पोलीस ठाणे उभारले गेले पाहिजे. तु्म्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. त्यात खूप वेळ जातो. देशातील विद्यापीठांमध्ये पोलीस ठाणे उभारले जाणे आवश्यक आहे. हे केवळ जेएनयूसाठी बोलत नाही, पण त्याची सुरुवात जेएनयूमधूनच करायला हवी,' असेही स्वामी म्हणाले.