नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीवर अलिकडेच चिंता व्यक्त केल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी, अर्थव्यवस्थेला पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त करताना, आर्थिक सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्लाही दिला आहे.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या नीतीला प्राधान्य द्यायला हवे. यामुळेच आपल्याला पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे शक्य होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेतील ही स्थिती तात्पुरती आहे, याची माहिती मलादेखील आहे. सरकारने काही ठोस पावले उचलल्यास, त्यावर तोडगा निघू शकतो. त्यानंतर अर्थवव्यस्था पुन्हा एकदा सुस्थितीत आलेली असेल, असे ते म्हणाले.