'खैबर पख्तुनवामध्ये लागू केलेला मार्शल कायदा मानवाधिकारांचे उल्लंघन आहे'
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) शुक्रवारी पाकिस्तानने खैबर पख्तुनवामध्ये लागू केलेल्या अध्यादेशवरून पाकिस्तानला चांगलेच फटकारले. आयसीजेने या अध्यादेशाचा निषेध करत पाकिस्तान मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, पाकिस्तानने खैबर पख्तुनवामध्ये 'मार्शल लॉ' लागू केला आहे, त्यानुसार खैबर पख्तुनवा पूर्णपणे सैन्याच्या अखत्यारीत असेल. पाकिस्तानच्या या अध्यादेशामुळे तेथील लोकांना सरकारने दिलेले बरेच अधिकारही संपुष्टात आले आहेत.
पाकिस्तानमध्ये वारंवार मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. जगातील बर्याच देशांमध्ये त्याविरूद्ध आवाज उठविला जात आहे. पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी पश्तोन यांनी नुकताच अमेरिकेच्या ह्युस्टनच्या रस्त्यावर पाकिस्तानविरोधात निषेध केला होता.
पाकिस्तानचा अध्यादेश हा मानवाधिकारांचे उल्लंघन आहे
आयसीजे आशियाचे संचालक फ्रेडरिक रोवस्की म्हणाले की, पाकिस्तानने धोकादायक व सूडबुद्धीने धोरण आखू नये. त्याऐवजी आपल्या देशातील न्याय प्रक्रिया आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यावर भर द्यावा. नव्या अध्यादेशात पाकिस्तानचा ढोंगीपणा लपलेला आहे. पाकिस्तान मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचा गुन्हा सातत्याने करत आहे.
खैबर पख्तुनवा येथे पाकिस्तानने ‘मार्शल लॉ’ लागू का केला?
खैबर पख्तुनवा प्रांतातील लोक सतत पाकिस्तानच्या वृत्तीविरूद्ध आवाज उठवितात. तसेच तेथील स्थानिक लोक नेहमीच पाकिस्तानपासून विभक्त होण्याची मागणी करतात. खैबर पख्तुनवाच्या लोकांना पाकिस्तानकडून कायम त्रासदायक वागणूक दिली जाते, त्यांचे शोषण केले जाते. म्हणूनच पख्तुनवाच्या लोकांना पाकिस्तानमधून स्वातंत्र्य हवे आहे.