पाकचा आडमुठेपणा : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भाषणावर टाकला बहिष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण आशियाई क्षेत्र सहयोग संघटनेत (सार्क) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. काश्मीरमधील 'बंदी' संपेपर्यंत भारताशी संपर्क साधणार नाही, असे कुरेशी यांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा आडमुठेपणा जगासमोर आला आहे.

 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी कार्यक्रमापासून दूर राहिले. भारतीय मंत्र्यांचे भाषण संपताच कुरेशी बैठकीत पुन्हा सहभागी झाले. भारत सरकारने ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानाचे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पाकचे नापाक मनसुबे धुळीस मिळत आहेत. दरम्यान कलम ३७० हटविणे हे आमचे अंतर्गत प्रकरण असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

 

‘सार्क’मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे. या परिषदेत सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असताना ३२ वर्षांत फक्त १८ वेळा ते एकत्र आले आहेत. २०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांगलादे, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द झाली. याला उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी होती.

@@AUTHORINFO_V1@@