विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर शाळा- महाविद्यालयाच्या अनेक परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या तारखा आणि निवडणूकांच्या कार्यक्रमांच्या तारखा एकाच दिवशी येत असल्याने २१,२२ तारखेच्या परीक्षा रद्द केल्या जाणार आहेत.

 

मुंबई विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार या काळात सुमारे ६८ विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केले जाणार आहेत. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. यंदा महाविद्यालयाचे लांबलेले प्रवेश परिणामी पहिल्या सत्राच्या लांबणाऱ्या परीक्षा यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे नियोजन कोलमडण्याचे चित्र दिसत आहे. तसेच शाळांनाही या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर पर्यंत परीक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर विद्यापीठाच्या टीवायबीकॉम, टीवायबीए , टीवायबीएसई यांच्या परीक्षांवर परिणाम होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@