नवी दिल्ली : पाकिस्तानची कारस्थाने कमी होत नसताना बालाकोटचे दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय वायुदलाने हेच स्थळ उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने तळ ठोकण्यास सुरुवात केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
“५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाचा कसा सामना करायचे ते आम्हाला माहीत आहे. कुठल्या जागेवरुन कशी कारवाई करायची ते आमच्या सैनिकांना माहीत आहे. आम्ही पूर्णपणे अलर्ट असून त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, याची खबरदारी घेऊ,” असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले.