हिंदू खासदाराने पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेत उपस्थित केला प्रश्न
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचार सातत्याने वाढत आहेत. याविरुद्ध पाकिस्तानातील हिंदूंचा राग अनावर होत आहे. बुधवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभागृहात याचाच प्रत्यय आला. जेव्हा पीएमएल-एनचे खासदार (नॅशनल असेंब्लीचे सदस्य) खेल दास कोहिस्तानी यांनी गेल्या चार महिन्यांत २५-३० हिंदू मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती दिली.
पुढे ते म्हणाले, "नम्रता चांदनी या हिंदु वैद्यकीय विद्यार्थ्याची सिंधमधील लारकाना जिल्ह्यातील वसतिगृहात नुकतीच हत्या करण्यात आली. त्याआधी दोन दिवसांपूर्वी, लारकाना जिल्ह्यातील घोटकी येथील हिंदू मुख्याध्यापिका नूतन दास यांच्यावर आरोप केले. शाळा, मंदिरे, धर्मशाळा आणि हिंदूंच्या मालमत्तेची तोडफोड केली. पोलिसांनी फक्त तमाशा पहिला. या घटनेनंतर घोटकीमध्ये शांतता आहे, हिंदू समाजातील लोक घाबरले आहेत. खरं तर, घोटकी भागात हिंदू मुलींचे अपहरण केले जात आहे आणि त्यांना धर्मांतर करून मुस्लिम वयस्कांशी लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामागील मुस्लिम धर्मगुरू मियां मिठू आहेत. जो संपूर्ण परिसरातील हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्याचे षडयंत्र राबवित आहे."