बिग बींनंतर खिलाडी कुमारचीही मेट्रोला पसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : सध्या गाजत असलेल्या मेट्रो कारशेड आणि आरे जंगलप्रकरणी अनेक जणांनी आपली मते मांडली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत मेट्रोला पसंती दिल्यानंतर आता खिलाडी अक्षय कुमारनेदेखील मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. त्याने ट्विटवर एक व्हिडियो शेअर करत स्वतःचा अनुभव सर्वांना सांगितला. #LikeABoss असा हॅशटॅग देत 'मेट्रो ही अशी एकमेव वाहतूक व्यवस्था आहे जी पावसामध्ये थांबत नाही', असे सांगत त्याने मेट्रोचे कौतुक केले.

 
 
 

अभिनेता अक्षय कुमारने सांगितले की, "मला घाटकोपरमधून शूटिंग संपवून वर्सोवाला जायचे होते. रस्त्यावर ट्रॅफिकमुळे २ तासाचा कालावधी दाखवत असताना मला मेट्रोने मी अवघ्या २० मिनिटांमध्ये वर्सोवा पोहचतो. म्हणून अवघ्या २ तासांचे यानंतर मेट्रोमुळे मी २० मिनिटांमध्ये पार केले. ही एकमेव असे वाहतूक व्यवस्था आहे जी पावसामध्ये पाणी साठून बंद पडत नाही. त्यात तुमचा बराचसा वेळी कमी करते." अशाप्रकारे त्याने मेट्रोचे कौतुक केले.

@@AUTHORINFO_V1@@