मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमास जलील यांची अनुपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |



औरंगाबाद : मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सिद्धार्थ उद्यान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र, या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा दांडी मारली. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी सोशल मीडियावर विनंती करण्यात आली होती.

 

खासदार म्हणून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आमदार असताना गेली पाच वर्षे इम्तियाज जलील यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने मुक्तीसंग्राम दिनाला येणे टाळले. त्यामुळे जलील मुद्दाम कार्यक्रमास येण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावून घेतले होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून १७ सप्टेंबरचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला. या वेळी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या कामांमुळे या दिनाला विशेष महत्त्व आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@