मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “मराठवाडा मुक्ती लढ्यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढयातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो. राज्यातील सर्व लोकांना या विशेष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.