घुसखोरी करणाऱ्या २ पाकच्या सैनिकांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या २ सैनिकांना कंठस्नान घातले. याच सैनिकांच्या मृतदेह मागणीसाठी पाकच्या सैनिकांनी पांढरा झेंडा फडकावण्याची घटना एलओसीवर घडली. जम्मू काश्मीर येथील हाजीपूर भागात घुसखोरी करताना भारतीय सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत गोळीबार केला. ज्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिले आणि दोन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. या दोन जवानांच्या मृतदेहांची मागणी करत पाकिस्तानी लष्कराने पांढरे निशाण फडकवले आणि हे दोन मृतदेह घेऊन गेले.

 

११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत असून यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. पाकिस्तानी सैनिकांचा दोन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने खात्मा केला. मात्र त्यांचे मृतदेह नेण्यास पाकिस्तानने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र शुक्रवारी म्हणजेच १३ सप्टेंबरला पांढरे निशाण दाखवत पाकिस्तानी लष्कराने सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानात नेले. याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा समोर आली नसून पाकिस्तानी लष्करानेदेखील याबातमीला दुजोरा दिला नाही.

@@AUTHORINFO_V1@@