मोदी, 'ॐ', आणि गाय हे शब्द ऐकताच काहींच्या अंगावर काटा येतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2019
Total Views |





मथुरा
: मथुरेत भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले."मोदी
, गाय आणि '' हे शब्द ऐकताच काही लोकांच्या अंगावर काटा येतो. '' शब्द ऐकताच त्यांचे कान टवकारले जातात. देश १६व्या किंवा १७व्या शतकात जात आहे, असेही ते म्हणतात , परंतु याच लोकांनी इतके दिवस देशाचे वाटोळे केले आहे."अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर घणाघात केला.


यावेळी बोलताना मोदी यांनी पाकिस्तान आणि दहशतवादावरदेखील टीका केली. दहशतवाद ही एक जागतिक विचारधारा बनू पाहत आहे आणि त्याची पाळेमूळे ही आपल्या शेजारीच पाकिस्तानात रुजत आहेत. पण आपणही पूर्ण धैर्यानिशी याचा सामना करत आहोत. यावेळी ९ / ११ रोजी अमेरिकेवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.


"
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि प्रशिक्षण देणाऱ्यांविरुद्ध संपूर्ण जगाने उभे राहिले पाहिजे. भारत दहशतवादाचा सामना करण्यास सक्षम आहे. आम्ही हे भूतकाळातही दाखवून दिले आहे आणि भविष्यातही करत राहणार आहोत." असे पंतप्रधान म्हणाले.


देश सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन

यंदाच्या वर्षी आपण महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करणार आहोत. त्यामुळे २ ऑक्टोबरपर्यंत आपले घर, कार्यालय आणि परिसर सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन मोदी यांनी जनतेला केले. 'स्वच्छता हीच सेवा' या भावनेने आपण या मोहिमेची आजपासून सुरुवात करत आहोत. त्यामुळे आजपासून सुरू होत असलेले हे अभियान प्लास्टिकमुक्त भारताला समर्पित करूया.

@@AUTHORINFO_V1@@